Wednesday, May 5, 2010

सामान्य माणूस...

दादर..दादर... बांद्रा जाएगा...सायन ला सोडले तरी चालेल..... अरे यार अंधेरी नही तो पार्ले तक छोड दो....
नही साब वहा पे ट्रॅफिक बहुत है.. मैं अभी खाना खाने जा रहा हूँ... ३०० रुपये होंगे मीटर से नही आउन्गा....
टॅक्सी टॅक्सी.. अबे साले सुनते भी नही, ये हमारे लिये है या हम इनके लिये... दिमाग की दही करते है....
या सर्वाना पोकळ बांबुचे फटके द्यायला पाहिजेत... बाकी वेळी ठीक आहे पण अशा वेळी तरी यांनी ऐकले पाहिजे ना...
नाहीतर काय.... अहो आमच्या सोसायटी मध्ये चला बोलले की लगेच थोबाड वाकडी करतात ही लोक.....
टॅक्सीवाले, ऑटोरिक्षा वाले आणि सामान्यमाणूस यांच्यातली खडाजंगी...

कालच्या दिवसात एक एक संभाषण ऐकण्यासारखे होते... जितके हसायला येत होते त्यावेळी तितकेच डोक्यात विचार चक्र जोरजोरात फिरत होते... हा त्रास तसा नेहेमीचाच आहे... पण जेव्हा कधी आपत्कालीन स्थिती निर्माण होते तेव्हा त्याची जाणीव अधिक प्रमाणात होते... मग त्यावर सोल्यूशन नाहीच नाही हे लक्षात आल्यावर आपण एकटेच बडबडतो किंवा समोर जो कोणी असेल ( आपली आवडती व्यक्ती असेल तिलाही फुकट आणि तिच्या मनात नसताना सुद्धा ) तिला हे सर्व ऐकवतो... कधी कधी हा राग इतका अनावर होतो की एकाचा राग दुसर्‍यावर निघतो ( बिचारा त्याची चुकी नसताना सुद्धा )... आणि आपण मगाशी का रागावलो हा विचार करून पुन्हा आपण स्वत:वर चिडतो.....फाइनली पच्याताप करण्याची पाळी आपल्यावर येते...

एकूण काय आपण क्रांती आणण्याचा फक्त आणि फक्त विचार करू शकतो .... आणि समजा जर आणण्याचा प्रयत्न केला तर समोरचा आपल्याला वेड्यात काढतो... आपल्याला कोणी वेडा बोलला हे आपल्याला कसे चालणार बरे???.... म्हणून आपण सुद्धा असल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो... कधी कोणी चुकीचे वागतोय हे समजल्यावर मनातल्या मनात समोरच्यावर चिडतो..त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहतो... आणि काही करू शकणार नाही हे समजल्यावर काही झालेच नाही असे समजून सार काही विसरून जातो....

राजकीय पक्ष तर घडाळ्याच्या काट्यापेक्षा फास्ट....एका एका मिनिटांनी शब्द बदलतात (पक्ष बदलल्याप्रमाणे)....माझ्यामते आपण बहुदा त्यांच्यापेक्षा फास्ट आहोत ते जितक्या लवकर निर्णय बदलतात ना आपण तितक्या लवकर मनातल्या मनात पलटी मारतो आणि पुन्हा समोर जो कोणी असेल त्याला (ज्याला या कशातच इण्टरेस्ट नसतो त्याला) हे होणारच होते मला माहीत होते असे बोलून स्वत: ला सर्वांसमोर मिरवतो.. आणि त्यातच आनंद मानतो... तसे पण सध्या या कन्न्डीशन ला बिचारा सामान्य माणूस इतकेच करू शकतो....

No comments:

Post a Comment