Monday, February 1, 2010

भक्ति

आज अंगारकी सिद्धीविनायक मंदिरासमोर प्रचंड रांग लागली आहे... त्याचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी प्रत्येकाची होणारी धावपळ आणि मनाची चलबिचल... ही कोणती शक्ति आहे ते त्या गणरायलाच ठाऊक...

पण कधी कधी मनात एक विचार येऊन जातो खरच हे काय आहे तरी काय... माणूस खरचं देवाला भेटायला आतुर असतो की आपले मागणे मागण्यासाठी आसुसलेला असतो... कोणाच्या मनात काय चालेल हे मला तरी इकडे बसून समजणार नाही... असे मानून ते पण मी गणरायावरच सोडतो... माणूस पण कसा असतो ना जिकडे त्याला मर्यादा येतात तिकडे तो सर्व देवावर सोडतो... आणि जे त्याला जमते ते केल्यावर मी ते केले हे मिरवत फिरतो...

सकाळी टिव्ही वर सिद्धीविनायकचे दर्शन झाले... त्याला पाहण्यासाठी जमलेली लोकांची गर्दी पाहून आनंद होतो पण काही विचार मनात डोकावीतात आणि मन कासावीस होते... की आज भारतात लोक इतके शिकून सुद्धा अशिक्षित तर नाही ना राहीले???... हा प्रश्न पडण्याचे एक आणि एकच कारण आहे ते म्हणजे घरातली गणरायची मूर्ती असो किंवा सिद्धीविनायकाची शेवटी देव तर एकच आहे ना... मग हा साधा विचार माणूस का करत नाही???... की त्याला करायचाच नाही... जर भक्ति खरी असेल तर देव नक्कीच भेटतो मग तो कसाही भेटेल त्यासाठी सिद्धीविनायकचे दर्शन झाले पाहिजे असा अट्टहास का???

मला माहीत आहे की मी असे लिहिण्याइतका मोठा नक्कीच नाही झालो पण जे दिसते मनात जे काही कुजबुजते आहे ते मांडण्यासाठी काय हरकत आहे... आजच्या धावत्या जगात आपण असा विचार करायला लागलो तर खरच येणार्‍या पिढीला आपण काय शिकवणार??..

आपण देवाला माणसात पाहायला शिकलो तर????......देव सर्व पाहतोच आहे आणि त्यालाच ठरवू देत काय बरोबर आणि काय चुकीचे... मला जे काही वाटते ते त्यालाच अर्पण करायचे हे काम मी करतोय एकदम प्रामाणिकपणे.... आणि या पुढे मी काय करायचे ते ठरवण्यासाठी देव समर्थ आहेच... आता त्याला पण थोडा वेळ देतो नाहीतर देव बोलले सर्व तूच बोलतोयस अरे मला पण थोडा वेळ दे ना...:)... तर आता इकडेच थांबतो...

'राहुल गांधी' उवाच

'२६/११ रोजी मुंबईवर भीषण हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान कुणी घातले? बिहार, उत्तर प्रदेशच्या एनएसजी कमांडोंनी. त्यामुळे दहशतवाद्यांशी लढायचे तर बिहारींना मुंबईतच राहू दे' इति 'राहुल गांधी' उवाच....

अरे राजा पण त्यात मारले गेले त्यात जास्त संख्या कुणाची होती????.... कॉंग्रेस मध्ये एकच चांगला माणूस आहे असे वाटत असताना त्याने पण असे बोलावे???....आता तरुण सुद्धा मतदान करताना १०० वेळा विचार करतील... 'मुंबई सगळ्यांची आहे' मान्य आहे रे सोन्या...... पण म्हणून त्या बिचार्‍या मुंबई वरच राजकारण का??... त्यापेक्षा बाकीचे प्रदेश विकसित करण्याकडे लक्ष का देत नाहीस???... बिहार चा विकास करण्यावर जोर दे ना... आपण तिकडे का जात नाही.. असा बिहार बनवून दाखव की मुंबई सोडून सर्व तिकडे गेले पाहिजे... तर तुला मानतो... इतके सारे बोलण्यापेक्षा आपण सारे मिळून एक चांगला भारत बनवू इतके बोलला असता तर तुझ्याबदलचे माझे मत तरी चांगलेच राहीले असते... असो इति 'निलेश कुंजीर' उवाच... :)