Monday, February 1, 2010

'राहुल गांधी' उवाच

'२६/११ रोजी मुंबईवर भीषण हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान कुणी घातले? बिहार, उत्तर प्रदेशच्या एनएसजी कमांडोंनी. त्यामुळे दहशतवाद्यांशी लढायचे तर बिहारींना मुंबईतच राहू दे' इति 'राहुल गांधी' उवाच....

अरे राजा पण त्यात मारले गेले त्यात जास्त संख्या कुणाची होती????.... कॉंग्रेस मध्ये एकच चांगला माणूस आहे असे वाटत असताना त्याने पण असे बोलावे???....आता तरुण सुद्धा मतदान करताना १०० वेळा विचार करतील... 'मुंबई सगळ्यांची आहे' मान्य आहे रे सोन्या...... पण म्हणून त्या बिचार्‍या मुंबई वरच राजकारण का??... त्यापेक्षा बाकीचे प्रदेश विकसित करण्याकडे लक्ष का देत नाहीस???... बिहार चा विकास करण्यावर जोर दे ना... आपण तिकडे का जात नाही.. असा बिहार बनवून दाखव की मुंबई सोडून सर्व तिकडे गेले पाहिजे... तर तुला मानतो... इतके सारे बोलण्यापेक्षा आपण सारे मिळून एक चांगला भारत बनवू इतके बोलला असता तर तुझ्याबदलचे माझे मत तरी चांगलेच राहीले असते... असो इति 'निलेश कुंजीर' उवाच... :)

1 comment: