Monday, February 1, 2010

भक्ति

आज अंगारकी सिद्धीविनायक मंदिरासमोर प्रचंड रांग लागली आहे... त्याचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी प्रत्येकाची होणारी धावपळ आणि मनाची चलबिचल... ही कोणती शक्ति आहे ते त्या गणरायलाच ठाऊक...

पण कधी कधी मनात एक विचार येऊन जातो खरच हे काय आहे तरी काय... माणूस खरचं देवाला भेटायला आतुर असतो की आपले मागणे मागण्यासाठी आसुसलेला असतो... कोणाच्या मनात काय चालेल हे मला तरी इकडे बसून समजणार नाही... असे मानून ते पण मी गणरायावरच सोडतो... माणूस पण कसा असतो ना जिकडे त्याला मर्यादा येतात तिकडे तो सर्व देवावर सोडतो... आणि जे त्याला जमते ते केल्यावर मी ते केले हे मिरवत फिरतो...

सकाळी टिव्ही वर सिद्धीविनायकचे दर्शन झाले... त्याला पाहण्यासाठी जमलेली लोकांची गर्दी पाहून आनंद होतो पण काही विचार मनात डोकावीतात आणि मन कासावीस होते... की आज भारतात लोक इतके शिकून सुद्धा अशिक्षित तर नाही ना राहीले???... हा प्रश्न पडण्याचे एक आणि एकच कारण आहे ते म्हणजे घरातली गणरायची मूर्ती असो किंवा सिद्धीविनायकाची शेवटी देव तर एकच आहे ना... मग हा साधा विचार माणूस का करत नाही???... की त्याला करायचाच नाही... जर भक्ति खरी असेल तर देव नक्कीच भेटतो मग तो कसाही भेटेल त्यासाठी सिद्धीविनायकचे दर्शन झाले पाहिजे असा अट्टहास का???

मला माहीत आहे की मी असे लिहिण्याइतका मोठा नक्कीच नाही झालो पण जे दिसते मनात जे काही कुजबुजते आहे ते मांडण्यासाठी काय हरकत आहे... आजच्या धावत्या जगात आपण असा विचार करायला लागलो तर खरच येणार्‍या पिढीला आपण काय शिकवणार??..

आपण देवाला माणसात पाहायला शिकलो तर????......देव सर्व पाहतोच आहे आणि त्यालाच ठरवू देत काय बरोबर आणि काय चुकीचे... मला जे काही वाटते ते त्यालाच अर्पण करायचे हे काम मी करतोय एकदम प्रामाणिकपणे.... आणि या पुढे मी काय करायचे ते ठरवण्यासाठी देव समर्थ आहेच... आता त्याला पण थोडा वेळ देतो नाहीतर देव बोलले सर्व तूच बोलतोयस अरे मला पण थोडा वेळ दे ना...:)... तर आता इकडेच थांबतो...

No comments:

Post a Comment